ब्रेकिंग “पूल वाहून गेला… पण प्रशासन उभं राहिलं! तहसीलदार तेजस्विनी पाटील यांची धडाडीची कृती”
🛑 “पूल वाहून गेला… पण प्रशासन सजग! तेजस्विनी पाटील यांची तातडीची कारवाई!”
महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे–एरणे पूल मुसळधार पावसात वाहून गेल्याने संपूर्ण परिसरात हाहाकार माजला असताना, या परिस्थितीत एक संवेदनशील आणि तत्पर प्रशासनाची जाणीव करून दिली आहे – महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी!
24 तासांच्या आत ठोस निर्णय, बस बाहेर काढली, पर्यायी रस्ता सुरू!
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्यात थैमान घातलं आहे. गोगवे-एरणे परिसरात नवा पूल वाहून गेल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण, व्यापाऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं होतं.
पण या गंभीर स्थितीत तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला सतर्क केलं.
➡️ फक्त 24 तासांत घेतलेले निर्णय:
वाहून गेलेल्या पुलाच्या जागी पर्यायी दळणवळण रस्ता तयार करण्याचे आदेश
एसटी बस अडकलेल्या भागातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश
गावकऱ्यांसाठी रस्ता पुन्हा खुला करण्यात आला
काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरती वाहतूक व्यवस्था कार्यान्वित