रोहोट परिमंडळात लोकसहभागातून 9000 वृक्षांची लागवड; वनपाल काशीद यांचा संकल्प


रोहोट परिमंडळात लोकसहभागातून 9000 वृक्षांची लागवड; वनपाल काशीद यांचा संकल्प

सातारा | प्रतिनिधी इम्तियाज मुजावर

नवीन रस्ते, इमारती आणि सतत होत असलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे सध्या संपूर्ण देशातच पर्यावरणाचा समतोल ढासळताना दिसत आहे. यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आणि नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहोट परिमंडळात वनविभागाने लोकसहभागातून तब्बल 9000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

ही मोहीम रोहोट, खडगाव, धावली बीट या नियत क्षेत्रांमध्ये पावसाळा 2025 दरम्यान राबवली जाणार आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना रोहोटचे वनपाल राजाराम काशीद यांनी सांगितले की, संयुक्त वनव्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, विविध पर्यावरण प्रेमी संस्था, वन समितीचे अध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थ यांचा सक्रीय सहभाग यात असणार आहे.

काशीद यांनी सांगितले की, “माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक आहे. तो फक्त झाडांपासूनच मिळतो. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडे असतात तिथले आरोग्यही अधिक निरोगी असते.”

यामध्ये देशी वृक्षप्रजातींची निवड करून पर्यावरणपूरक वृक्षारोपणाला प्राधान्य दिले जाणार आहे. यासोबतच वनरक्षक तुषार लगड, दत्तात्रय हेर्लेकर आणि प्रकाश शिंदे या अधिकाऱ्यांच्या नियत क्षेत्रात देखील ही लागवड करण्यात येणार आहे.

सदर वृक्षलागवड उपक्रम वन विभागाचा एक दीर्घकालीन आणि परिणामकारक पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न ठरणार आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!