पुणे सातारा महामार्ग गाड्यांचा की घोड्यांचा वाहन चालकांचा संतप्त सवाल

पुणे सातारा महामार्ग गाड्यांचा की घोड्यांचा वाहन चालकांचा संतप्त सवाल

सातारा इम्तियाज मुजावर
हा रस्ता आहे की खड्ड्यांचा किल्ला? पुणे-सातारा महामार्गावर वाहन चालवताना गाडी चालवत आहोत की घोड्यावरून उड्या मारत आहोत, असा प्रश्न आता वाहनचालकांना पडतोय!

शेंद्रे, नागठाणे, आणेवाडी, भुईंज, पाचवड – या सगळ्या भागांमध्ये महामार्ग नाही, खड्ड्यांची साखळी आहे. गुडघाभर खड्डे, तुडुंब पाणी, आणि त्यातून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. वाहतूक मंद गतीने चालतेय, काही ठिकाणी तर थेट ट्राफिक जामचं संकट.

सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे – तासवडे आणि आणेवाडी टोलनाक्यांवर रोज लाखो रुपयांची टोल वसुली होतेय, पण रस्त्यांची दुरुस्ती कुठेच नाही! नागरिक चवताळलेत, रस्ते दुरुस्त न करता टोल वसुली थांबवा, असा ठणठणीत सवाल केला जातोय.

नागठाणे ते अती परिसरापर्यंत रस्त्यावर शेकडो नव्हे, तर ‘कोट्यवधी खड्डे’ असल्याचं वाहनचालक व्यंगात्मक भाषेत सांगतायत.

हे बघा, हे टोल महामार्ग आहे की “खड्डे महामार्ग”? कोणी जबाबदार? कुणी उत्तर देणार? का वाहनचालकांनी फक्त सहन करत राहायचं?

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!