संयम, समाजसेवा आणि सत्याची लेखणी – महेश बारटक्के

महेश बारटक्के – समाजकारणातील संयमी नेतृत्व

दहा आकडा आकर्षकतेचा, यशाचा आणि पुढील प्रवासाचा अंक मानला जातो.

10 मे हा दिवस जावळी तालुक्यातील दैनिक सकाळचे संवेदनशील आणि संयमी प्रतिनिधी महेश बारटक्के यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण आहे. कायमस्वरूपी चेहऱ्यावर स्मित असलेला, गोरा गोमटा आणि गोंडस महेश बारटक्के यांची ओळख शब्दांच्या संयमातून परखड लेखणी गाजवणाऱ्या पत्रकार म्हणून आहे.


कुटुंबाचा वारसा

महेश बारटक्के यांचे कुटुंब राजकारण आणि समाजकारणात निष्ठावंत आणि परखड भूमिकांसाठी ओळखले जाते.

त्यांचे आजोबा, कै. यशवंत बारटक्के, आणि वडील प्रमोद बारटक्के यांनी कायम मितभाषी पण प्रभावी संवाद साधण्याची परंपरा जोपासली.

आई सौ. शोभाताई बारटक्के या विद्यमान प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या संचालक आहेत.

कुटुंबाने नेहमीच आपल्या व्यवसायातील आणि समाजातील नात्यांना जपले आहे.


परखड लेखणीचे 17 वर्ष

गेल्या 17 वर्षांपासून महेश बारटक्के यांनी दैनिक सकाळमध्ये जावळी तालुक्यातील प्रत्येक घडामोडी अचूकपणे मांडल्या आहेत.

त्यांची लेखणी नेहमीच सत्याची कास धरून चालते.

राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर परखडपणे भाष्य करत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.


सामाजिक आणि राजकीय नेतृत्व

कै. लालसिंगराव शिंदे यांच्या विचारधारेला पुढे नेण्याचे कार्य बारटक्के कुटुंबाने केले.

कै. राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक आणि राजकीय वाटचाल केली.

सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महेश बारटक्के यांनी समाजकारणात आणि राजकारणात दमदार पाऊल ठेवले.


ओबीसी चेहरा – एक आश्वासक नेता

कुडाळ जिल्हा परिषद गटात ओबीसी चेहरा म्हणून महेश बारटक्के यांना पाहिले जाते.

संयमी वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांची ओळख पुढे येत आहे.


मैत्रीची नवी व्याख्या

मैत्रीच्या दुनिये जीवाला जीव देणारा मित्र कसा असावा तर महेश कडे पाहिले जाते किस्सा असा आहे. कोरोनाचा काळ होता कोणी कोणाला स्पर्श करत नव्हता कोणीही कोणाच्या जवळ जात नव्हता .अत्यंत भयानक अशी अवस्था असतानाच त्याकाळची एक एक वाक्य एक एक घटना आजही डोळ्यासमोर आली तर अंगाचा थरकाप उडतो. अशा काळात माणूस माणसापासून इतका दूर झाला होता मात्र मला अर्थात इम्तियाज मुजावर यांना त्यावेळी कोरोना झाला होता. एच आर सिटी साठी सातारला जायचं होतं घरातला कुठलाही व्यक्तीला बरोबर घेऊन जाणं शक्य नव्हतं .त्याचवेळी समोरून महेश चा फोन आला याने माझे तब्येतीची विचारपूस केली. त्याला फक्त मी इतकच म्हणालो महेश माझी एच आर सी टी साताऱ्यात जाऊन करायची आहे त्यावेळी एका क्षणाचा विचार न करता महेश म्हणाला घराच्या बाहेर ये गाडी घेऊन मी येत आहे . आणि पुढच्या सीटवर बसून जवळ मला बसवून त्यांना थेट सातारा गाठलं .आणि एचआरसीटीच्या दालनामध्ये मला हाताला धरून घेऊन गेला. असा मित्रासाठी जीव धोक्यात घालणारा महेश ची आठवण कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील. मित्रासाठी जीव धोक्यात घालणारा महेशचा स्वभाव हा माझ्यासाठीच नाहीतर प्रत्येक त्याच्याशी जोडलेल्या मित्राबाबत अशीच त्याची भावना आहे. म्हणून राजकारणात समाजकारणात अशी व्यक्तिमत्व कायमस्वरूपी पुढे ताकदीने आली पाहिजे. आणि अशा व्यक्तींना नेतृत्वांकडून खूप मोठी ताकद मिळाली पाहिजे .तरच समाज घटनकामध्ये महेश सारखा एक आदर्श नेता व्यक्ती समाजाची अखंड सेवा करू शकतो


शुभेच्छा आणि आशीर्वाद

आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांना असंख्य शुभेच्छा आणि आशीर्वाद. त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीत त्यांना यश लाभो हीच सदिच्छा! पत्रकार इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून 97 65 56 68 61

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!