“स्मार्ट ग्राम सावलीत १५०० देशी झाडांची लागवड – हरितक्रांतीकडे भक्कम पाऊल”

मेढा,दि . १२ : स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ सुरू झाली असून आज या लोकचळवळीत लोकसहभागातून ग्रामस्थ , महिला ,
,विद्यार्थी व वृक्षप्रेमी तसेच लायन्स क्लब सातारा यांच्या वतीने १५०० देशी झाडांची डोंगररानात वृक्षलागवड करण्यात आली .
गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी प्रथम वृक्षारोपन करून या मोहीमेचा शुभारंभ करून शेकडो हातांनी आज १५०० देशी झाडांची लागवड करण्यात आली

.
यावेळी सरपंच विजय सपकाळ, जिल्हा परिषचे तज्ञ समन्वयक अजय राऊत , लायन्स क्लब साताराचे अध्यक्ष ॲड मंगेश महामुलकर, खजिनदार डॉ संतोष ढोणसे विस्तार अधिकारी ए . पी .पवेकर, शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ दळवी, केंद्रप्रमुख बळवंत पाडळे, शाखा अभियंता आकाश मस्कर,ग्रामपंचायत अधिकारी वैभव निकम , सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश मोरे,मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिपक भोसले, माध्यमिकचे मुख्याध्यापक के सी गाढवे , मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, ग्रामपंचायत सदस्य आनंदा जुनघरे, सुरेश कांबळे, आनंदी जुनघरे, वनिता म्हस्कर, निर्मला जुनघरे, मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब रूपवणकर ,
पोलिस पाटील संजय कांबळे आदी उपस्थित होते .
प्रारंभी संपूर्ण गावातून वृक्षदिंडी ढोल ताशांच्या गजरात व झाडे लावा झाडे जगवा घोषणांच्या जयघोषात काढण्यात आली .
यानंतर
डोंगररान परिसरात एक हजर ५०० देशी झाडांची लागवड करण्यात आली .


या हरितक्रांती मोहिमेत ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी ,ग्रामस्थ मंडळ , अजिंक्य नेहरू युवा मंडळ ,सर्व सदस्य, महिला मंडळ , लायन्स क्लब सातारा ,क्रांती विद्यालय, जिल्हा परिषद प्राथ केंद्र शाळा सावली, अंगणवाडी, तसेच कर्मचारी, तसेच पंचक्रोशीतील वृक्षप्रेमी ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता .
गावामध्ये “वृक्ष चळवळ ही लोक चळवळ” सुरू झाली असून प्रत्येक कुटुंबाला संवर्धन करण्यासाठी एका पेक्षा अधिक झाडे दत्तक देण्यात येणार आहेत . त्याची शंभर टक्के जोपासना करण्याची जबाबदारी त्या कुटुंबाची राहणार असल्याचे यावेळी ग्रामपंचायत अधिकारी वैभव निकम यांनी सांगीतले .
कोट : डॉ निलेश पाटील
गटविकास अधिकारी पं स जावळी
क्लीन आणि ग्रीन सावली खरोखरच स्मार्ट ग्राम कडून हरित ग्राम करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून सर्वच गावांना आदर्शवत आहे . उपक्रमशील सावलीला सर्वोतपरी सहकार्य देणार .


सरपंच विजय बा .सपकाळ यांनी सांगीतले, की

“आज लावलेले हे देशी झाड उद्या आपल्या पिढ्यांसाठी थंड सावली, स्वच्छ हवा आणि निरोगी जीवन देणार आहे .
त्यामुळे आपण एकत्र हरित सावली निर्माण करू या.”

लायन्स क्लब सातारचे दिलीप वहाळकर,म्हणाले या उपक्रमामुळे सावली गाव केवळ स्मार्ट ग्रामच नव्हे तर हरित ग्राम म्हणूनही ओळखले जाईल . येथील सरपंच त्यांचे सहकारी ग्रामस्थ यांची एकजूट वाखाण्याजोगे असून सर्वांना आदर्शवत आहे .
पोलिस पाटील संजय कांबळे यांनी आभार मानले .

यावेळी माजी सरपंच दुयोधन जुनघरे, ग्राम महसुल अधिकारी बाळासाहेब कर्चे, कृषी सहायक विलास कदम, प्रा के ए पठाण, आर डी जंगम , दीघे गुरुजी, अकुंश सपकाळ, लायन्स वलबचे खजिनदार ॲड संतोष ढोमसे
दिलीप वहाळकर ,
श्रीकांत भोईटे,
सुनील हेंद्रे,
अमोल तावरे,
प्रशांत जाधव, प्रकाश जुनघरे तानाजी केमदारणे आदी उपस्थित होते

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!