
सातारा जिल्ह्याला मिळाले दोन उपमुख्यमंत्री: एक ऐतिहासिक क्षण
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात ५ डिसेंबर २०२४ रोजी एक ऐतिहासिक घटना घडली, ज्या अंतर्गत एकाच जिल्ह्यातून दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब येथील, तर अजित पवार मूळ कोरेगाव तालुक्यातील नांदवळ येथील आहेत. सध्या त्यांचं कार्यक्षेत्र बारामती आहे मात्र जन्म ठिकाण व गाव कोरेगाव तालुक्यातील नांदवळ आहे

सातारासाठी अभिमानाचा क्षण सातारा जिल्ह्याच्या या दोन सुपुत्रांना मिळालेल्या या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पदामुळे जिल्ह्यात जल्लोषाची लाट पसरली आहे. गेल्या काही वर्षांत पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळाला होता गत वेळी सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर आता जिल्ह्याच्या दोन सुपुत्रांना उपमुख्यमंत्री मिळाल्याने या सातारा जिल्ह्यातील प्रदेशाच्या राजकीय भूमिकेला नवा आयाम मिळालाय. यासोबतच, जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक निधी आणि प्रकल्पांच्या लाभाची आशा व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या शपथविधीचा सोहळा मुंबई येथील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एकाच जिल्ह्यातून दोन उपमुख्यमंत्री निवडले गेले हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनोखे आणि ऐतिहासिक घटक ठरले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच जिल्ह्यातून दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने या जिल्ह्याच्या राजकीय महत्त्वाला एक नवा उंची गाठली आहे.

निधी आणि विकासासाठी नवा दृषटिकोन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यभाराची सुरुवात झाल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या विकासाची गती आणखी वाढवण्याची अपेक्षा आहे. यामध्ये जिल्ह्याला मिळणारे निधी, योजनांचे कार्यान्वयन आणि पायाभूत सुविधांची सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे राजकीय सशक्तीकरण त्यांच्या जिल्ह्याचे हित साधण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
भावी मंत्रिपदाच्या शक्यता सातारा जिल्ह्याला उपमुख्यमंत्रिपदाचा फायदा झाल्यानंतर, आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरु आहे. कोणते आमदार मंत्रीपद मिळवतील याची उत्सुकता असून, जिल्ह्याच्या नेत्यांमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याची अपेक्षाही आहे.
सातारा जिल्ह्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाल्याने साताऱ्याच्या या दोन्ही सुपुत्राच्या माध्यमातून विकासाला वेग मिळणार आहे. मात्र, भविष्यातील राजकीय संतुलन आणि विकासासाठी या नेत्यांना जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्रातील सुधारणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावावी लागेल.