सातारा
पालकमंत्री शंभूराजे यांनी
सातारा जिल्हा प्रशासनाला टंचाईचा अहवाल सादर करण्याची पालकमंत्र्यांचे आदेश.. चारा छावणी बाबत आठ दिवसात अहवाल सादर होणार..
सातारा जिल्हा नियोजन समितीचा गेल्या वर्षीचा निधी 99.87% खर्च झाला असून यावर्षीच्या विकास कामांच्या प्रस्तावाच्या शासकीय मंजुऱ्या तातडीने घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना केले आहे.. पाऊसकाळ लांबल्याने पाणीटंचाईचा सामना पूर्वेकडील तालुक्यांना करावा लागत आहे.. पाणीटंचाई तसेच संभाव्य चारा छावण्याचे अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे आदेश संबंधित प्रांताधिकार्यांना आणि तहसीलदारांना दिले आहेत.. पूर्वेकडील भागात 74 गावात 74 टँकरने पाणीपुरवठा केला जात असून यामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे कुठेही आढळले नाही मात्र टँकरने पुरवठा होत असलेल्या पाण्याचे नमुने तपासले जातील.. अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे..