शेती, सेवा आणि निष्ठेचा संगम – अमोलजी भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

इम्तियाज मुजावर यांच्या लेखणीतून

शेते (ता. जावळी) या छोट्याशा गावातून आपल्या कार्याचा मोठा ठसा उमटवणारे नाव म्हणजे श्री. अमोलजी भिलारे. शेतकरी कुटुंबातून आलेले, पण नोकरीच्या पलीकडे जाऊन व्यवसायाच्या क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवणारे आणि जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून उभे राहणारे हे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीसाठी एक आदर्श ठरले आहे.

ड्रीप इरिगेशनमध्ये नावारूपाला आलेला विश्वासार्ह ब्रँड

ड्रीप इरिगेशन व स्प्रिंकलरच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर “पाणीटंचाईमुक्त शेती” साकार करणारे श्री. भिलारे यांनी जावळी तालुक्याच्या खेड्यापाड्यांपासून ते पाचगणीच्या पायथ्यापर्यंत आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे. केवळ तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरही त्यांनी ड्रिप इरिगेशनचे विस्तृत जाळे उभे केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेले त्यांचे ड्रिप इरिगेशनचे दुकान म्हणजे शेतकऱ्यांच्या विश्वासाचे केंद्रस्थान बनले आहे. तसेच बालाजी बोरवेल च्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या शेत शिवारामध्ये पाण्यासारखी ईश्वरी शक्ती उपलब्ध करून देण्यासाठी बालाजी बोरवेल च्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना बोरवेलच्या दर्जेदार सेवा देत शेत शिवारामध्ये पाणी खळखळ वाहून देणारे बालाजी बोरवेल च्या माध्यमातून अमोल भिलारे यांनी शेतकऱ्यांची सेवा केली आहे

शांत, संयमी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व

मितभाषी, शांत आणि संयमी स्वभाव, चेहऱ्यावर नेहमी हास्याची लहर आणि प्रत्येक शेतकऱ्याला आदराने मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणून श्री. भिलारे यांच्याकडे शेतकरी मोठ्या विश्वासाने पाहतो. शेतीच्या प्रत्येक गरजेसाठी ते सल्ला देतात, नवे तंत्रज्ञान पोहचवतात आणि उत्पादनाची विक्रीसाठी बाजारपेठ शोधतात. मुंबई-पुणेच्या बाजारपेठांपर्यंत शेतीमाल पोहचवून शेतकऱ्यांसाठी विक्रीची दारे खुली करणाऱ्या या कार्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे.

एक राजकीय निष्ठावान कार्यकर्ता

श्री. भिलारे हे केवळ व्यवसायिक नव्हे, तर साताऱ्याचे लोकप्रिय आमदार व बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावान कार्यकर्ता आहेत. निवडणूक असो, सार्वजनिक काम असो, की समाजोपयोगी उपक्रम – प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे कार्य केले आहे. “शिवेंद्रराजे तोच आमचा पक्ष” या तत्वज्ञानावर ठाम राहून त्यांनी आपली राजकीय भूमिका पारदर्शक ठेवली आहे.

शेतीतून समृद्धीकडे – एक प्रेरणादायक प्रवास

“नोकरी लागली नाही म्हणून आयुष्य थांबत नाही”, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. पारंपरिक शेतीत नवतंत्रज्ञानाचे मिश्रण करून त्यांनी व्यवसायात क्रांती केली. दुर्गम डोंगराळ भागातील शेतकऱ्यांनाही नव्या पद्धतीने शेती करण्यासाठी प्रेरणा दिली. आज त्यांचा व्यवसाय एक यशस्वी मॉडेल म्हणून उभा आहे, आणि त्यांचं जीवन हे अनेक नवयुवकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.


श्री. अमोलजी भिलारे यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!

आपल्या कार्यातून प्रेरणा देणारे, निष्ठेने समाजासाठी झटणारे, आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवणारे श्री. भिलारे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी आणि यशस्वी जावो हीच सदिच्छा!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!