-:
नवीमुंबई, दि. २५ – माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही खूप गंभीर आहोत, अण्णासाहेबांची जयंती म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून मी खाही देतो की. अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा आत्मा आम्ही मरु देणार नाही आणि बदलूही देणार नाही वा माथाडी कायद्याची छेडछाडही आंम्ही करणार नाही अथवा रद्दही करणार नाही,

अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतिने माथाडी कायद्याचे जनक कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त नवीमुंबईतील कांदा-बटाटा मार्केटच्या प्रांगणात आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते, देवेंद्र फडणवीस पुढे असे म्हणाले की, फेक माथाडी कामगार आणि खंडणी वसुल करणा-यांना जेलबंद करता आले पाहिजे, त्यासाठी माथाडी कामगार व नेत्यांनी चर्चा करुन माथाडी कायद्यात योग्य ते बदल सुचवावेत. जेणेकरुन खंडणीखोर आणि फेक माथाडी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत, आम्ही शासनामार्फत त्यांच