पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे मोठे निर्णय – पाकिस्तानशी संबंध तोडण्याचे पाऊल

( Pti)पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे मोठे निर्णय – पाकिस्तानशी संबंध तोडण्याचे पाऊल

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेतले आहेत. खालीलप्रमाणे चार महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत:

  1. सिंधू जल करार रद्द: भारत सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल वाटप करार पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन पाण्याचा करार संपुष्टात येणार आहे.
  2. पाक उच्चायोग बंद: भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाकिस्तानचे राजदूत यांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  3. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश: भारतात वास्तव्यास असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यांना एक आठवड्याच्या आत देश सोडण्याची सक्ती करण्यात आली आहे.
  4. अटारी चेक पोस्ट बंद: भारत-पाकिस्तान दरम्यानचा प्रमुख सीमेवरील अटारी चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

हे निर्णय देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि दहशतवादाविरोधातील कठोर भूमिकेचा भाग म्हणून घेण्यात आले असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!