जयंत पाटलांनी बाळासाहेब पाटील यांना ‘पवारांना संभाळा’ का दिला सल्ला? राजकीय वर्तुळात खळबळ(व्हिडीओ)

जयंत पाटलांनी बाळासाहेब पाटील यांना ‘पवारांना संभाळा’ का दिला सल्ला? राजकीय वर्तुळात खळबळ

सातारा: नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्याविषयी चांगलीच चर्चा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांचा मोबाईल नॉट रीचेबल असल्याची माहिती समोर येत असल्याने राज्यभर खळबळ माजली आहे.
याच पार्श्वभूमीवर सत्यजीत पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जयंत पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांना “पवारांना संभाळा” असा सल्ला दिला.

या सल्ल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेषत: नेमकं कोणत्या पवारांना जयंत पाटील यांनी ‘संभाळा’ असं सांगितलं याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे अजित पवारांच्या सोबत जाऊन सरकार मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना एक नवा वळण मिळालं आहे.

याशिवाय, माजी आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक मंत्री पद शिल्लक ठेवण्याचे वक्तव्य केल्याने जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या संभाव्य एकत्रित योजनेवर नवीन चर्चा सुरू झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी कोणता मोठा बदल होतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!