जम्मू-काश्मीर येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जावळी भाजपाचं निवेदन तहसीलदारांना सादर


जम्मू-काश्मीर येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाचं निवेदन तहसीलदारांना सादर

मेढा, ता. २३ एप्रिल – जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या अमानुष आतंकवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला, ही घटना संतापजनक असून देशाच्या सुरक्षेवरील थेट आघात आहे. या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना अधिकृत निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी तालुक्याचे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे भाजप अध्यक्ष श्री. संदीपजी परामने, , तसेच मारुती चिकणे जावली पश्चिम अध्यक्ष,हणमंत शिंगटे संचालक बाजार समिती जावली, रवी महामुलकर, अशोक गोळे, विकास धोंडे, ज्ञानेश्वर रांजणे, संतोष महामुलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. परिसरातील अनेक मान्यवर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण देशासह महाराष्ट्र आणि जावळी तालुक्यातही या हल्ल्याविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भाजपच्या जावळी तालुक्यातील शिष्टमंडळाने जावळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केंद्र सरकारने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत, देशाच्या सुरक्षेसाठी एकत्र उभं राहण्याचा निर्धार केला.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!